Wednesday, December 23, 2015

Into the soul

 Into the soul

I...now walk into the soul..

There was a lot of load on my soul
I really do not know I was living as human being
Perhaps I was pretending it very perfectly..
till the gentle and modest angel became my blushing bride
And my flesh started to changing some paranoid genes

Your every little sacrifice helps to me
to understand the meaning of love and devotion
Every day your smiles spread rainbows of happiness
over the tiny world to fill the love
Your constant support keeps me to feel strong
and my life in every day become more meaningful

You complete me with heart of unconditional love towards our family
and with soul of extreme purity inspires me
to exhale the darkness inside my spirit
You helped me to free from myself
and the life became lighter as wind
& I started to believe in existence of extreme bondings

Your countless forgiveness for every foolishness
and unlimited mistakes of mine, makes my life easier to stay happy...
and the acceptance of every one of me
including the hairy, bald and fatty and a little introvert
makes me most handsome man on the earth...
I am a lucky man to have you in my life

I know..just portraying the feelings through these few words
may not give a justice to your presence in my life
but how...how can I explain?
what you mean to me..
may be I never said this before..
but this time..I am sure..
I love you..love u so much..
my heart, my life, my soul, my wife...

राऊ
२३.१२.२०१५

Wish you a very happy anniversary Sadhana..

Friday, November 27, 2015

भारतमाता...

भारतमाता...

हृदयी सदैव त्यास होती माया
गंगेस स्पर्धा होती पवित्र्याची
मन होते निर्मळ नभाहुनी
काळजी दुर्बलाची त्यास पुत्रासमं

स्पर्धा कसली अघोरी छेडली
बंधुस बंदुक तिथे कसला शेजारी
पाया धर्माचा स्वार्थाने बळकवला
नीतीस त्यानी सागरी डुंबविले

युगांयुगे झेलले अनंत वार परक्यांचे
न डगमले धीर तीव्र घाव सोसुनही
बेगडी तीर आत्म्यास भेदतात आजकाल
वाटते बलिदान पुत्रांचे माझ्या गेले वाया

जीव गुदमरतो माझा ढोंगात सहिष्णुतेच्या
का ते राम रहीम फ़क्त पुस्तकी लपले?
का ते ज्ञानचे भांडार हरवले याज्ञवल्क्यांचे
झुरते मन माझे पाहून सत्य या नयनी

कोणी आहे का भरतभुमीत मज परत
माझा भारत द्यायला...
थोड़े प्रेम पुरेसे आहे आधार मज द्यायला
आणि परत तोच भारत बनावयला...

राऊ
27।11।2015


Sunday, September 27, 2015

छत्री...

                                 छत्री

      आज सुट्टीहि होती आणि थोड़ उशिरा ही जाग आली. कसल्यातरी कामानिमित्त  बाहेर जायचा योग आला. तस सुट्टी दिवशी बाहेर जायच हे आपल्याला पटल नव्हतच आणि तो आपला धर्म ही नव्हता पण सगळी तत्व खूंटीला टांगून बाहेर पड़ायच ठरवल. बाहेर पड़ता क्षणीच् मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परत घरी येऊन छत्री शोधयला सुरु केल. पण नेहमीप्रमाणे कोणतीही वस्तु जागच्या जागी असेल तर शप्पथ. इकडे टिकडे शोधुन झाल्यावर शेवटी वाटल अड़गळीत शोधाव. अड़गळीत सोनही सापडत अस म्हणतात त्याचा प्रत्यय आज आला. शेवटी छत्री चा शोध मी लावलाच. आनंद गगनात मावेनासा झाला.

          थोड्या प्रकाशात आल्यावर काहीतरी भलतच सापडल्याचा प्रत्यय आला. ती छत्री..गुलाबी रंगाची फुला-फुलांची. थोड्या वेळासाठी श्वास च थांबल होत. डोक बधीर झाल होत. कुरुक्षेत्रवरून युध्याच्या एका रात्री घरी परतून आल्यावर वसुला पाहुन  कर्णाला जेवढा आनंद झाला नसेल त्याहुन अनेकपटीने मला आनंद झाला होता हे नकक्की. ती छत्री तीचीच होती..माझ्या वसु ची. छत्री वरच्या अनेक फुलांसोबत तिच्या सोबताच्या गोड आणि सुंदर आठवणींचा खजानाच माझ्या हाती लागला होता. बाहेरचा पाऊस आणि माझ ते महत्वाच काम केंव्हाचा विसरलो होतो मी.

           छत्रीवरच्या एका फुलाला हाताशी घेऊन तसाच घराबाहेर पडलो. पावसाची भीती नव्हती ना कसलीच. तिच्या आठवणीत भीजलोच होतो मी. पाऊस आहे नाहीये कशाचच भान नव्हतं मला. थोड़ अंतर गेल्यावर कुणाचा तरी धक्का लागून भानावर आलो मी आणी छत्री उघडून पुन्हा घरी आलो. आणि ती छत्री लपवली ती कायमची. पण छत्रीवरच्या फुलांचा गंध श्वासात बहरला तो कायमचा...अगदी कायमचा...

राउ
26।09।2015
रात्रो 10.01

Wednesday, July 8, 2015

मित्र...

                    मित्र...

भय केंव्हाचे संपले होते त्याचे
प्रचंड सुंदर दिसत होता तो
परत ती काठी उचलून
जमीनीवर रेश मारीत..काहीतरी पुटपुटत
डोंगराच्या दिशेने पळत सुटला होता तो
यावेळी हतातल चक्कर पण
जोरदार भिरभिरत होत त्याच

डोंगरावर आवडता मित्र होता त्याचा
लाखों मुळाचं आधार असलेल शापित वडाच झाड़
कदाचीत मन मोकळ करण्यासाठी
जात असावा तिथे
कदाचीत गुरुच मानित असावा त्याला
माणसाना थोड़ घाबरायचा तो
त्यामुळेच मनुष्यरूपी मित्र मोजकेच होते त्याचे
यावेळी कसल्यातरी स्वप्नाने
त्याला पछाडलेल होत
बहुतेक त्या बद्दल सल्ल्यासाठी गेला असावा..

मित्राच्या खांद्यावर हात ठेवावा तसा
बिनधास्त पारंब्यावर हात होता त्याचा
भन्नाट शांततेत तो त्याच्याशी
गप्पा मारीत होता
वसंतागमन होणार असल्याने त्याचा मित्र
खुपच अनुभवी वृद्धासारखा भासत होता
पण प्रेमाची सावली देणारे त्याचे कर
खुप विस्तारलेले होते
आणि चिरतरुण पालवी होत्या आभाळाकाठी

त्यांच्या गप्पात सुर्यास्त झाला त्याला कळल नाही
मनाशी कसलातरी संकल्प करुन
त्या म्हातारया अन् अनुभवी गुरुचा अन मुक्या मित्राचा निरोप घेऊन
परत भिरभिरणाऱ्या चक्करच्या सोबतीने
बेभान पळत सुटला तो
त्याच्या स्वप्नांच्या दिशेने..स्वप्नांच्या दिशेने...

विपुल आरवाडे
28.04.2015

Sunday, June 28, 2015

दान..

                         दान....

आज माथ्यावर  कोसळणार पाणी आणी
त्या रात्रीच्या पाण्यात प्रचंड साम्यता होती
ओंजळीत पड़णाऱ्या त्या थेंबाचा स्पर्श
त्या चिमुकल्या हातांना झालेल्या स्पर्श्या इतकच उबदार वाटत होत
म्हणूनच कदाचीत गंगेशी माझ नात येवढ गाढ़ झाल
आजही ह्या लाटा तश्याच आधार देतात मला
त्या मातेला ही कल्पना नसेल कदाचीत
की गंगाच माझी पहिली आई आहे ते


आज तीची ती शेवटची ओळखही नसल्याने
आज मला धन्य वाटत आहे
मला कदाचीत दूसरा जन्म मिळाला आहे
सारे श्रेय माधवास् देऊ की माझ्या कर्मास
मग त्याच ते कपट असो वा नियती
माधवास दान देऊन मी तर माझ कतर्व्यच केल
मग थोडा तेजस्वी पना कमी झाला म्हणून काय झाल...
ते तर धनुर्विदयेेन केंव्हाचा मला तेजोमय केल आहे
अगदी त्या परशुरामानी घेतलेल्या त्या परिक्षे पासून...
पार्थास नक्कीच याची प्रचीती आली असेल

आज जिंकणही पराभवच असेल पण
माझ्या मित्रास अंतर मी नाहीच देऊ शकत
मग भले आभाळ का समोर उभा ठाकेना
भलेही द्रौपदीने केलेला अपमान मी गिळु शकेन् पण
पार्थास् मी धड़ा शिकवीणारच आणि मित्रास साथ अखंड देईन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत...
मातेच्या वचनाने माझे पाचही बंधू सूटले तरीही...
धर्म अधर्म या गोष्टीच भान आणि भय दोन्हीही नाही राहील आता
बंद डोळ्यांनी वार करेंन पण करेन

कुणास दान हवे आहे का? कुणास दान हवे आहे का?  या माझ्या शब्दांसोबत 'होय' असा आवाज आला...
मागे बघतो तर कुनीच नव्हतं..
कदाचीत माझच् मनाची आवाज असेल..
स्वातंत्र्याच् दान मागत असावा तो..
मनताच हसून परत निघालो..
वसु वाट असल म्हणून...
आज तिची खुपच आठवण येत आहे..
तिला भेटून परत जायचहि आहे...

कुणास दान हवे आहे का?
कुणास दान हवे आहे का?

विपुल आरवाड़े
28|06|2015

Wednesday, April 8, 2015

नियती...

                   नियती 

प्रिये अश्वास सोडूनी किनारी सारथी 
दमडीसाठी  दुर पलिकडे गेला धाउनी 
दूष्ट नावाद्याचे कपट दांडगे 
विश्वास ठेउनी समय बिघडले

अश्वास वाटले क्षण जाईल वाऱ्यासारखे 
समभ्रमात सारथ्याने पाऊल उचलले 
व्याकूळ अश्व पाण्यात डुंबले 
तोवर सखा सारथ्याने तीर गाठले 

प्रेम दोघांचे अखंड विश्व जाणीले 
आपलेच त्यांचे हेच जानुनी विसरले 
क्षणात लाटा सागरासम उसळून 
ठेवले होते नियतीने तेच मांडून 

खोट्या प्रतिष्तेपायी नावाड्याने केंव्हाचा हात सोडला 
सारथ्याचे काळीज कासावीस झाले 
संभ्रमात अश्वही सैरभैर धाऊ लागले 
चार पावलांचे अंतर क्षणात आभाळाला टेकले 

कुठे होता चक्र सारथ्याकडे माधवासारखा 
नियतीचा कायदाच तो घावाचा 
दुनियेस आवडे पाढा बेगडी नियमांचा 
त्यास पर्वा कोठे वेड्या काळजांची 

अन नियतीने परत तेच केले…. 

विपुल आरवाडे.
०६.०४.२०१५  

Thursday, April 2, 2015

रक्तबंबाळ गुलाब...

              रक्तबंबाळ गुलाब 

कदाचित माझं नेहमीचं निर्मळ प्रतिबिंब 
आज थोडं गढूळ भासत होत 
प्रार्थनेत आआणि श्रद्धेत बुडालेल निळशार आभाळ 
हिंसक काळ्या ढगांनी तुडुंब भरलेलं होत 

रावणाचीही तपश्च्यर्या तितकीच गाढ होती तरी
त्याला रामाची बरोबरी कधीच करता आली नाही 
दानवीर सुर्यापुत्रानेही हसत हसत कवच-कुंडल दान केली  
म्हणून काय असत्याच विजय नाही झाला

बागेत पहिलं पाऊल पडताक्षणी दिसलेलं 
अध्यात्माने भरलेलं हसणारं मोहक श्वेत गुलाब 
मला विरक्तीची दिशा दाखऊ पाहत होत 
पण अशुद्ध विचारांची माझी नस जास्तच धगधगत होती 

जहालवादी मित्रवर्गाच्या रक्तरंजित योजना 
अनेकवेळा निष्फळ झाल्या असल्या तरी 
आज सुर्य माझाच होता... 
बागेत हसणाऱ्या त्या निस्वार्थी गुलाबाची तुलना 
प्रचंड काळ्या बंदुकीशी मोठ्या अभिमानाने करत होतो 

अतिशय क्रूर पाऊलानी आणी मिथ्या स्वाभिमानाला कवटाळून 
अगदी आरामात निशाणा साधला 
थाड थाड आवाज करत त्या बेभान गोळ्या 
सरळ निस्वार्थी आणी विरक्त आत्म्यात घुसल्या 

थोडं रक्त त्या तेजस्वी गुलाबावरही उडालं होत 
गुलाब रक्तबंबाळ होऊनही वेगळीच चमक आली होती त्याला 
त्या गर्दीत राम राम आवाजासोबत 
माझं मिथ्या अस्तित्व ही संपूर्ण विरघळून गेलं 
मात्र सत्याचं ते रूप अमर झालं ते कायमचं …


विपुल आरवाडे 
२९.०३.२०१५ 


Sunday, February 1, 2015

स्वाभिमानी लाल पाणी आणी माती…

                           स्वाभिमानी लाल पाणी आणी माती

                 उद्या सुट्टी असल्याने अगदी आनंदात घरी निघालो होतो.सोसायटीच्या नोटीस बोर्ड वर लक्ष्य गेलं. उद्या नळाला पाणी येणार नव्हत अशी नोटीस होती.प्रचंड राग आला होता कारण सुट्टीचा दिवस आणी त्यात पाणी नाही पण थोड आनंद ही झाला कारण  नगरपालिकेने थोड्या वेळेसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. आता ते पाणी जालियानवाल्या बागेतल्या विहिरीतून येणार होत अशी नोटीस लागली होती. झोपी जाउ पर्यंत डोक्यात पाण्याचा विषय चालूच होता कारण संताप होत होता उद्या नळाच पाणी येणार नव्हत कारण ते पाणी काळ धूर सोडणाऱ्या फ्यक्टरीला जाणार होत.घरी पाणी नाही म्हणाल्यावर शेतीला तर पाणी मिळण्याचा संबंधच नव्हता. हे आता नेहमीचच झाल होत.तक्रार करायचं अस नेहमीच ठरवायचो पण स्वाभिमान बहुतेक गहाणच ठेवलो आहे त्यामुळे नाही झाल ते. बहुतेक आमच्या जनरेशन ने स्वाभिमान एक तर गहाण ठेवला आहे नाहीतर कवडीमोलाला केंव्हाचा विकला आहे.मला शंकाही आहे की बहुतेक मित्र लोकांना स्वाभिमानाचा अर्थ ही कळत असावं. असलंच कसलातरी विचार करीत झोप लागली.

                सकाळी लवकरच जाग आली.नळाच पाणी सुरु केल आणी पाहतो तर काय लाल भडक पाणी येऊ लागलं.माझा संताप आणखीनच वाढला.ठरवलं आता तक्रार करायचच.थोड्या वेळानंतर घरातून निघालो.रस्त्यात जालियानवाला बाग लागलं.पाणी जालियानवाल्या बागेतल्या विहिरीतून आलं होत म्हणून थांबलो आणी वाटलं आधी इथेच चेक करून जावं. तसं इलेक्शनची सुट्टी होती मला वेळ पण भरपूर होता कारण माझ वोटिंग गावाकड होत.कर्म तर करतच होतो पण वाट स्वार्थाची होती याची जाणीव तरी झाली होती. पण गीतेच्या कर्माशी आणी माझ्या या स्वार्थी कर्माचा लांबचा ही संबंध नव्हता.अरुंद गल्लीतून चालत असताना विचारच रवंथ चालूच होता.शेवटी विहिरीपर्यंत येउन पोहोचलो. एवढी वर्षे  जालियानवाला बागेजवळ राहत असून एकदाही भेट दिली नव्हती या इतिहासिक बागेला. पण बाकीच्या फालतू टिकाणी आयुष्य घालवलं.विहिरीत डोकाऊन पाहिल्यावर माझं  प्रचंड  लोकांची चेहरे दिसू लागले.आणी ओरडण्याचे,किंचाळण्याचे आवाज येऊ लागले . मला बहुतेक चक्कर येऊ लागले होते. काही समजतच नव्हते.परत पहिले तर ती लोकं जीवाच्या आकांताने ओरडत होते.त्या काकूजवळ  तर छोटेसे बाळ ही होते. अहिंसावादि स्वातंत्र सेवकांच्या घोषणासोबत  जनरल डायर चे फायर-फायरररररररररर चे आवाज आणी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज कानात घुमू  लागले. डोक फुटायची वेळ आली होती.

                ताड्कन डोकं विहिरीबाहेर काढलं. असंख्य लोकांनी आपले जीव गमावले होत या जालीयनवाला बागेत देशाला स्वातंत्र्य मिळवून  देण्यासाठी. फायर फायर असे  कमांड आणी बंदुकीच्या आवाजाने डोक अजुनही गर गरत होत. लाल पाणी तर  दिसलं नव्हत पण बागेत रक्ताने लाल झालेली माती स्पष्ट दिसत होत आणी सैरावैरा धावणारे ते जादुई लोकं. अचानक एका छोट्या मुलावर लक्ष्य गेल.छोट्याश्या काचेच्या बाटलीत रक्ताने ओली झालेली माती भरत होता तो. डोळ्यात राग आणी अश्रू असले तरीही त्याचे डोळे विलक्षण चमकत होते.थोड्या वेळात ध्यानात आल कि तो छोटा मुलगा दुसरा कुणीही नसून भगत सिंग आहेत. माती भरत भरत काहीतरी पुटपुटत होता तो. देशप्रेमाने भरलेला होता तो.कदाचित त्यांची दिलेल्या प्राणाच्या आहुतीच आपल्याला किंमत नाही किंवा अजून ते आपल्याला सजलच नाही म्हणून आपण एवढे स्वार्थी बनलो आहोत. कि साधा मतदान हि नाही करत,कचरा ही निवांत रस्त्यावर टाकतो आणी निषेध नोंदवण्याचा संबंध तर नाहीच नाही. ह्या लाचारीमुळे स्वताचीच लाज वाटू लागली होती ,डोळे भरून आले होते. देशासाठी खूप काही करता आले नसले तरी आपल कर्तव्य तरी पार पडायला हव. नाहीतर आयुष्य जगून आयुष्याला शून्याचीही किंमत राहणार नाही. मी तसाच त्या छोट्या भगत सिंग कडे पाहत उभा होतो.

              अचानक असल्यातरी आवाजाने डोळे उघडले आणी स्वप्नात होतो ते कळाल.पण त्या स्वप्नाने आणे लाल पाणी-मातीच्या स्वाभीमानाणे माझे डोळे उघडले ते कायमचे.

विपुल आरवाडे
२६.०१.२०१५