Wednesday, April 8, 2015

नियती...

                   नियती 

प्रिये अश्वास सोडूनी किनारी सारथी 
दमडीसाठी  दुर पलिकडे गेला धाउनी 
दूष्ट नावाद्याचे कपट दांडगे 
विश्वास ठेउनी समय बिघडले

अश्वास वाटले क्षण जाईल वाऱ्यासारखे 
समभ्रमात सारथ्याने पाऊल उचलले 
व्याकूळ अश्व पाण्यात डुंबले 
तोवर सखा सारथ्याने तीर गाठले 

प्रेम दोघांचे अखंड विश्व जाणीले 
आपलेच त्यांचे हेच जानुनी विसरले 
क्षणात लाटा सागरासम उसळून 
ठेवले होते नियतीने तेच मांडून 

खोट्या प्रतिष्तेपायी नावाड्याने केंव्हाचा हात सोडला 
सारथ्याचे काळीज कासावीस झाले 
संभ्रमात अश्वही सैरभैर धाऊ लागले 
चार पावलांचे अंतर क्षणात आभाळाला टेकले 

कुठे होता चक्र सारथ्याकडे माधवासारखा 
नियतीचा कायदाच तो घावाचा 
दुनियेस आवडे पाढा बेगडी नियमांचा 
त्यास पर्वा कोठे वेड्या काळजांची 

अन नियतीने परत तेच केले…. 

विपुल आरवाडे.
०६.०४.२०१५  

No comments: