Friday, November 27, 2015

भारतमाता...

भारतमाता...

हृदयी सदैव त्यास होती माया
गंगेस स्पर्धा होती पवित्र्याची
मन होते निर्मळ नभाहुनी
काळजी दुर्बलाची त्यास पुत्रासमं

स्पर्धा कसली अघोरी छेडली
बंधुस बंदुक तिथे कसला शेजारी
पाया धर्माचा स्वार्थाने बळकवला
नीतीस त्यानी सागरी डुंबविले

युगांयुगे झेलले अनंत वार परक्यांचे
न डगमले धीर तीव्र घाव सोसुनही
बेगडी तीर आत्म्यास भेदतात आजकाल
वाटते बलिदान पुत्रांचे माझ्या गेले वाया

जीव गुदमरतो माझा ढोंगात सहिष्णुतेच्या
का ते राम रहीम फ़क्त पुस्तकी लपले?
का ते ज्ञानचे भांडार हरवले याज्ञवल्क्यांचे
झुरते मन माझे पाहून सत्य या नयनी

कोणी आहे का भरतभुमीत मज परत
माझा भारत द्यायला...
थोड़े प्रेम पुरेसे आहे आधार मज द्यायला
आणि परत तोच भारत बनावयला...

राऊ
27।11।2015


No comments: