स्वाभिमानी लाल पाणी आणी माती
उद्या सुट्टी असल्याने अगदी
आनंदात घरी निघालो होतो.सोसायटीच्या नोटीस बोर्ड वर लक्ष्य गेलं. उद्या नळाला पाणी
येणार नव्हत अशी नोटीस होती.प्रचंड राग आला होता कारण सुट्टीचा दिवस आणी त्यात
पाणी नाही पण थोड आनंद ही झाला कारण
नगरपालिकेने थोड्या वेळेसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. आता ते पाणी
जालियानवाल्या बागेतल्या विहिरीतून येणार होत अशी नोटीस लागली होती. झोपी जाउ
पर्यंत डोक्यात पाण्याचा विषय चालूच होता कारण संताप होत होता उद्या नळाच पाणी
येणार नव्हत कारण ते पाणी काळ धूर सोडणाऱ्या फ्यक्टरीला जाणार होत.घरी पाणी नाही
म्हणाल्यावर शेतीला तर पाणी मिळण्याचा संबंधच नव्हता. हे आता नेहमीचच झाल
होत.तक्रार करायचं अस नेहमीच ठरवायचो पण स्वाभिमान बहुतेक गहाणच ठेवलो आहे
त्यामुळे नाही झाल ते. बहुतेक आमच्या जनरेशन ने स्वाभिमान एक तर गहाण ठेवला आहे
नाहीतर कवडीमोलाला केंव्हाचा विकला आहे.मला शंकाही आहे की बहुतेक मित्र लोकांना
स्वाभिमानाचा अर्थ ही कळत असावं. असलंच कसलातरी विचार करीत झोप लागली.
सकाळी लवकरच जाग आली.नळाच
पाणी सुरु केल आणी पाहतो तर काय लाल भडक पाणी येऊ लागलं.माझा संताप आणखीनच
वाढला.ठरवलं आता तक्रार करायचच.थोड्या वेळानंतर घरातून निघालो.रस्त्यात
जालियानवाला बाग लागलं.पाणी जालियानवाल्या बागेतल्या विहिरीतून आलं होत म्हणून
थांबलो आणी वाटलं आधी इथेच चेक करून जावं. तसं इलेक्शनची सुट्टी होती मला वेळ पण
भरपूर होता कारण माझ वोटिंग गावाकड होत.कर्म तर करतच होतो पण वाट स्वार्थाची होती
याची जाणीव तरी झाली होती. पण गीतेच्या कर्माशी आणी माझ्या या स्वार्थी कर्माचा
लांबचा ही संबंध नव्हता.अरुंद गल्लीतून चालत असताना विचारच रवंथ चालूच होता.शेवटी
विहिरीपर्यंत येउन पोहोचलो. एवढी वर्षे
जालियानवाला बागेजवळ राहत असून एकदाही भेट दिली नव्हती या इतिहासिक बागेला.
पण बाकीच्या फालतू टिकाणी आयुष्य घालवलं.विहिरीत डोकाऊन पाहिल्यावर माझं प्रचंड
लोकांची चेहरे दिसू लागले.आणी ओरडण्याचे,किंचाळण्याचे आवाज येऊ लागले . मला बहुतेक चक्कर येऊ लागले होते.
काही समजतच नव्हते.परत पहिले तर ती लोकं जीवाच्या आकांताने ओरडत होते.त्या
काकूजवळ तर छोटेसे बाळ ही होते.
अहिंसावादि स्वातंत्र सेवकांच्या घोषणासोबत
जनरल डायर चे फायर-फायरररररररररर चे आवाज आणी बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज
कानात घुमू लागले. डोक फुटायची वेळ आली
होती.
ताड्कन डोकं विहिरीबाहेर
काढलं. असंख्य लोकांनी आपले जीव गमावले होत या जालीयनवाला बागेत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. फायर फायर
असे कमांड आणी बंदुकीच्या आवाजाने डोक
अजुनही गर गरत होत. लाल पाणी तर दिसलं
नव्हत पण बागेत रक्ताने लाल झालेली माती स्पष्ट दिसत होत आणी सैरावैरा धावणारे ते
जादुई लोकं. अचानक एका छोट्या मुलावर लक्ष्य गेल.छोट्याश्या काचेच्या बाटलीत
रक्ताने ओली झालेली माती भरत होता तो. डोळ्यात राग आणी अश्रू असले तरीही त्याचे
डोळे विलक्षण चमकत होते.थोड्या वेळात ध्यानात आल कि तो छोटा मुलगा दुसरा कुणीही
नसून भगत सिंग आहेत. माती भरत भरत काहीतरी पुटपुटत होता तो. देशप्रेमाने भरलेला
होता तो.कदाचित त्यांची दिलेल्या प्राणाच्या आहुतीच आपल्याला किंमत नाही किंवा
अजून ते आपल्याला सजलच नाही म्हणून आपण एवढे स्वार्थी बनलो आहोत. कि साधा मतदान हि
नाही करत,कचरा ही निवांत
रस्त्यावर टाकतो आणी निषेध नोंदवण्याचा संबंध तर नाहीच नाही. ह्या लाचारीमुळे
स्वताचीच लाज वाटू लागली होती ,डोळे
भरून आले होते. देशासाठी खूप काही करता आले नसले तरी आपल कर्तव्य तरी पार पडायला
हव. नाहीतर आयुष्य जगून आयुष्याला शून्याचीही किंमत राहणार नाही. मी तसाच त्या
छोट्या भगत सिंग कडे पाहत उभा होतो.
अचानक असल्यातरी आवाजाने
डोळे उघडले आणी स्वप्नात होतो ते कळाल.पण त्या स्वप्नाने आणे लाल पाणी-मातीच्या
स्वाभीमानाणे माझे डोळे उघडले ते कायमचे.
विपुल आरवाडे
२६.०१.२०१५
No comments:
Post a Comment