Thursday, March 24, 2011

आवडती माणसं...favourites

mine first attempt to write someting like article or I really dont know what is this... :)
 
                              आवडती\favourite माणसं...

            माणसं म्हणाल्यावर ती कोणीही असू शकतात...मग ती कधी कधी ओळखीची असू शकतात तर कधी अनोळखी ही असू शकतात...तर कधी ओळखीची असूनदेखील अनोळखी असू शकतात...मग त्या माणसांमध्ये कोणी न आवडणारी असतात तर कोणी matter च करत नसतात तर काही माणसं आवडीची पण असतात...
            आवडीची माणसं...काही माणसं आपल्याला खूप आवडीची असतात...कधी कधी ती माणसं आपल्या जवळची असतात कधी खूप दूरची...तर कधी जवळ असूनही दूर असणारी...कधी कधी ते दूर असल्याने किंवा ओळख नसल्याने त्यांच्याशी बोलू शकत नाही...तर कधी कधी त्यांच्याशी बोलणच शक्य नसत..तर कधी कधी नशिबाने आपण आपल्या आवडीच्या माणसांशी बोलत असतो...कधी हळू हळू  ओळख होत होत ओळखीची माणस खूप आवडत जातात तर कधी कधी ओळख नसतानाही खूप आवडू लागतात...का आवडू लागतात? या प्रश्नाला उत्तर नसत...मी तर माझ्या आवडीच्या लोकांना fav म्हणतो आणी शक्य असेल तर सांगतो ही..पण अस कधीतरच घडतं...कारण ओळखीच्या लोकांच्यात fav  असण जरा अवघड असतं...आणी खर तर तेच आपले खरे  fav असतात...आणी आपण त्यांना तसं सांगू शकतो कारण ते खूपच समंजस असतात...कारण  त्यांना सगळ माहीत असतं...
             कधी कधी ही माणस आपल्याला खूप प्रेरणादायी असतात...मूड खराब असला तर त्यांच्या नुसत्या स्मरणानेच प्रोब्लेम solve  होत असतात...खरच..नवीन मार्ग दिसू लागतात...उगीचच हसू येत...ते नेहमीच
आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर support करत असतात...मग ते directly असो वा indirectly...पण ते सतत सोबत असतात...
             अस वाटत की ही आवडीची माणस...आपल्या आयुष्यात आले की आपल जीवन समृद्ध होईल...म्हणजे आपल्याला आयुष्यात काहीतरी मौल्यवान मिळाल आहे...का कोणास ठाऊक? वाटत ही माणस आपल्या आयुष्यात आली पाहिजेत...म्हणजे आयुष्य थोड पूर्णत्वाकडे जाईल...उगीचच त्यांना खूप अर्थ मिळून जातो आपल्या आयुष्यात...ते खुप काही बनून जातात आपल्यासाठी...आणे तेही अचानक...काही कारण नसताना...ही माणस खूपच जवळची वाटू लागतात...
किंवा त्यांच्यासाठी  नाही तरी आपल्यासाठी तरी जवळची होतात...  
               अस वाटत कि त्यांना जाणून घ्यावं...जवळून ओळखावं...मग अनेक प्रश्न येतात डोक्यात की ह्या माणसाना जाणून घेतल्यावर त्यांच्याबद्दल काहीतरी कळेल आपल्याला...की आपल्या आवडीच्या माणसाना काय आवडतं?...कोणते बुक आवडतं?...कोणते movies आवडतात?...कोणते songs आवडतात?...गाणे म्हणायला आवडतं? की फक्त ऐकायलाच?...गोड आवडतकी तिखट?...सतत बडबडायला आवडतं की गप्प बसून ऐकायाला?...त्यांना आपल्याशी मैत्री करायला आवडेल का?...त्यांना कोण आवडतं?...त्यांना काय आवडतं?...अशी अनेक प्रश्न मनात येतात... याचा अर्थ असा नाही की आपण त्याचं copy | अनुकरण करायचं...पण अस उगीचच वाटत असतं की आपल्याला आपल्या आवडीच्या माणसांबद्दल सगळ किंवा थोडे तरी असाव...अस का वाटत?हे मला नाही माहीत...हे intuition  असतं...so it  is very pure... असं येत मनात...आणी यात काही गैर नसतं...आणी असेल तर मला तर नाही पटत...        
             खर तर  आपण त्यांच्यासाठी  काहीही करायला तयार असतो...पण या काहीही करण्यात आपला काहीच स्वार्थ नसतो...फक्त आपण त्यांना आनंदी पाहायचं असतं...आणी आपण आपल्या आवडीच्या माणसांना उपयोगी पडता आलं तर यापेक्षा मोठ्ठी गोष्ट काही नसते...कारण ते करायला आपल्याला सुद्धा खूप आनंद मिळत असतो...खर तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच होत असतात...
              काही वेळा आपण आपल्या आवडीच्या माणसांशी बोलू शकतो तर कधी ते possible नसतं...कारण कधी कधी आपल्या हाताबाहेर असतं...e .g .मला आमीर  आवडतो किंवा साधना खूप आवडते पण यांच्याशी बोलन जरा मुश्कीलच आहे....कदाचित शक्य नाही......पण कधी कधी हे जमतही...कारण ते आपल्या ओळखीचे असतात..आपण आपल्या आवडीच्या माणसांशी बोलू शकतो...असा योग सुद्धा कधी कधी येतो...मग सगळ जग मस्त होऊन जात... :)
              कधी कधी...पण चुकून ही आवडीची माणस आपली ओळखीची बनतात...मग ओळखीच नात मैत्री मध्ये  आणण्याचा निस्वार्थ प्रयत्न ही करतो...कधी कधी हे जमत ही...तर कधी कधी नाही जमत...कारण आपल्या आवडीच्या माणसानंही मित्र निवडण्याचा अधिकार असतो...की त्यांना आपण किती जवळचे किंवा महत्वाचे वाटतो?...किती खर वाटतो?...पण अश्या अनेक गोष्टी जुळून आल्या की ही अनोळखी पण आवडीची माणस आपली चांगली मित्र बनतात...त्यानाही आपण आवडू लागतो...मग दोन्ही बाजून्ही भावनांची...शब्दांची ...प्रश्नाची..उत्तरांची...अपेक्षांची..आशेची..मदतीची...आधाराची...आनंदाची...देवाण-घेवाण सुरू होते...हळू हळू जवळीकता वाढू लागते...आपुलकी वाढू लागते...प्रेम वाढू लागत...जिव्हाळा वाटू लागतो...
              आणी मग दोघांच ही आयुष्य ऐकामेकांच्या ओळखीमुळे...सहवासामुळे...मैत्रीमुळे...आवडीमुळे...विश्वासामुळे समृद्ध बनत जात...बनत...आयुष्य मस्त वाटू लागत...जगण्याला अर्थ मिळतो...मग यातून एक पवित्र...निरागस...हळवं...निख्खळ...विश्वासाचं...नात निर्माण होत...मजबूत बनत जात...आणी मग हे गोड नात हसत खेळत आयुष्याच सार्थक करत...आणी आपल्या favourite शी  आपलं चांगल नात...relation ...असण याहून जास्त आपल्याला आयुष्यात काय हव असतं...
              कदाचित असंच कसतरी असतं आपलं आपल्या खऱ्या favourites शी होणारा प्रवास...सहवास...ओळख...मैत्री.....बस्स ऐवढचं...आणखी काहीच नाही.... :)



विपुल आरवाड़े
२3.०3.२०११