Saturday, September 4, 2010

आयुष्याच्या गर्दीत हरवल्यासारखं झालंय....

आयुष्याच्या गर्दीत हरवल्यासारखं झालंय

कोण दूर कोण जवळ
कळेणास  झालंय...

आयुष्याच्या गर्दीत
हरवल्यासारखं झालंय...


भावनांच्या चक्रव्युहात
अभिमन्यू होत  चाललोय
...
परतीची वाट तर 
खूपच धूसर झालंय...

प्रेम तर नशिबात
नसल्यासारखं
झालंय ...
पण उगीचंच झुरायचं
व्यसन जडलंय...


मन बिच्चारं सारखं  
हूलकावण खातंय
...
खूळ उगीचंच आधाराला
प्रतिबिंबाच हात पकडतंय... 



गर्दची साथही
असहाय्य  होत चाललंय
...
आठवणींच्या आक्रमनापुढे  
नशा हरत चाललंय...



धुंद मध्यरात्रीशी तर
मैत्री वाढतच चाललीय
...
निर्मनुष्य रस्ता तर
ओळख बनतेय...


रस्ता हरऊन तर  
युग होत आलंय
...
पण उगाचंच पावलांची
चढाओढ 
चाललंय...

स्वप्न पडायची तर
केव्हाच बंद झालंय
...
त्यामुळे नव्या परीची
चाहूलही विरत
चाललंय...


आज तर पाऊस खूपच
पडु लागलंय
...
ढगातून बरसायाच सोडून
डोळ्यातून बरसू लागलंय...      



कुणी येणार नसतानाही  
रस्त्यावर नजर रोखतंय
...
मग नंतर उगीचच
स्वतःच समजूत काढतंय...



वाटतय जीव लावण्याचं
खेळ बंद करावं
...
मतलबी  दुनियेत
हरऊन जावं...

कोण दूर कोण जवळ
कळणास  झालंय
...
आयुष्याच्या गर्दीत
हरवल्यासारखं झालंय...

  


विपुल आरवाड़े
०३.०९.२०१०